ऐतिहासिक चरित्रे: भाग २- जयवर्मा दुसरा
लेखक: नरेंद्र वेलणकर
जयवर्मा द्वितीय याचा जन्म कुठे आणि कधी झाला या बद्दल विश्वासार्ह माहितीजरी उपलब्ध नसली तरी त्याने कंबोडियामधील लहान लहान राज्यांना/लोकसमूहांना एकत्र आणून इ.स. ८०२ मध्ये ख्मेर राज्याची सुरुवात केली हे तेथील पुराव्यांवरून कळते. काही अभ्यासकांच्या मते या आधीच्या काळात तो जावा मध्ये मांडलिक म्हणून होता असे परंतु कठपुतळी सारखे राज्य करणे काही मान्य होईना म्हणून कंबोडियामध्ये राज्य स्थापनेस सुरुवात केलेली दिसते. जावा मधील टोळ्यांकडून आक्रमणाचा त्रास होत होता त्यामुळे त्याने बऱ्याच राजधान्या बदललेल्या दिसतात. समुद्रतीरापासून आत राजधानीची स्थाने नेलेली दिसतात असेही काही पाश्चिमात्य अभ्यासक/संशोधक म्हणतात. परंतु यात मुख्यत्वे ताब्यात असलेल्या भागाच्या मध्यभागी राजधानी असावी असे जाणूनबुजून केलेले दिसते. त्यातून कोणतेही षड्यंत्र अथवा कट, कारस्थाने करण्यास जास्त वेळ मिळू नये आणि राजकीय विरोधकांनी/शत्रूनी काहीही करण्याच्या आत राजधानी बदलेली असलेली कित्यांचे सर्व यत्न वाया जावेत असापण विचार असावा असा एक कायास आहे. जयवर्मा द्वितीय याने प्रथम व्याधपूर येथे राजधानी केली नंतर शंभुपुर, इंद्रपुर, हरीहरालय व अमरेन्द्रपुर या ठिकाणी हलवलेली दिसते.
यानंतर जावा कडून कंभूज देशावर जी आक्रमणे होत होती ती पण कमी झालेली होती. जयवर्मा द्वितीय याने मोठ्या प्रमाणावर भूभाग ताब्यात घेतलेला दिसतो, राज्य कसे वाढवावे, त्याचे रक्षण कसे करावे याचा एक विशिष्ठ विचार पण त्याच्या मनात होता हे दिसून येते. ज्यास आजच्या काळात आपण ‘blue print’ म्हणतो ती त्याच्या डोक्यात नक्की पक्की असावी आणि त्याप्रमाणे त्याने राज्य वाढवलेले दिसते. हे सर्व करत असताना त्यास आवश्यक म्हणजे ‘ख्मेर’ ही पण राजाश्रयाने त्याने वाढवलेली दिसते. ‘ख्मेर’ लिपीचा पण वापर मोठ्या प्रमाणावर सुरु केलेला दिसतो. यातूनच अ-क्षर अशा गोष्टींना दिलेले महत्व दिसून येते, काहीतरी आपल्या नंतर राहावे हा विचार दिसून येतो. यामुळेच कि काय पण पुढे त्याने ‘देवराज’ पंथाची स्थापना केलेली दिसते. देवराज या शब्दाचे दोन अर्थ दिसून येतात ते म्हणजे राजा हाच देवाचा अंश म्हणजे देव किंवा देवांचा राजा म्हणजे इंद्र (असेही काही पाश्चिमात्य संशोधकांचे मत आहे). यात राजा हाच देव हा अर्थ जास्त सयुक्तीक वाटतो. राजा हा सर्व जनतेचा सांभाळ करणारा, त्यांचे रक्षण करणारा त्यामुळे सुद्धा त्यास देवाचा अवतार मानले गेले आहे आणि मृत्युनंतर तो देवरूप होतो म्हणजे देवच होतो असा भाव आहे.
राजा गादीवर आल्यावर त्याच्या नावाने एक राष्ट्रीय देवालय (मंदिर) बांधले जात असे आणि राजाच्या मृत्यूनंतर त्या राजास एक बिरूद दिले जाई व त्या नावाने पूजा केली जात असे. हे मंदिर नेहमीच त्या राजाच्या उपास्य देवतेचे असे (उदा. शिव, विष्णू इ.). जयवर्मा द्वितीय यास ‘परमेश्वर’ या नावाने संबोधले जाई. यातही राजाचे मृत्युनंतरचे नाव हे जिवंत असतानाच्या नावापेक्षा वेगळेच असे.
स्डोक कोक थोम (sdok kok thom) येथील शिलालेखातून याच्या कार्यकालात याच्याकडे ‘हिरण्यदामन’ नावाचा तांत्रिक आला होता व त्याच्याकडून आपल्या सीमा सुरक्षित करून घेण्यासाठी तांत्रिक कार्य करवून घेतले ते करण्यास हिरण्यदामनने त्यास शैव होण्यास सांगितले. त्याने राजपुरोहितास (शिवकैवल्य) त्याच्याकडील विद्यांचे प्रशिक्षण दिले. पुढे या राजाने फर्मान काढले की या देऊळाची पूजा शिवकैवल्याच्या घराण्यात राहावी तशी ती पुढे चालू होती.
जयवर्मा द्वितीयच्या राजकीय काळात त्याचे अर्थकारण हे प्रामुख्याने शेती आणि मासेमारी यावर अवलंबून होते. त्याच्या राजधानीच्या नवीन जागा पाहताना त्याने जास्तीत जास्त शेतीला उपयुक्त जागा पाहिलेल्या दिसतात. जास्तीत जास्त सपाट आणि भरपूर पाणी असणारे प्रदेश आजूबाजूला असतील याची काळजी घेतली. ‘टोनले सॅप’ नावाच्या १२,८७६ चौ.कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेल्या मोठ्या जलाशयाच्या जवळ त्याने हरीहरालय, अमरेंद्रपुर या राजधान्या वसवल्या.
एकंदरच जयवर्मा द्वितीयच्या पूर्ण आयुष्याकडे पाहता सर्वात जास्त काळ राज्यावर राहिलेला राजा होता हे प्रामुख्याने दिसते, दूरदर्शीपणा, धोरणात्मक नीती दिसून येते. याचे नाव त्याच्या मृत्यूनंतर ३०० वर्षानंतर लिहिलेल्या शिलालेखात पण दिसून येते या वरून त्याचा पराक्रम हा नक्कीच लोकांच्या लक्षात राहणारा होता यात शंका नाही. इंद्रवर्मा याने इ.स. ८८९ साली बांधलेल्या ‘प्रीह को’ या मंदिरात मध्यभागी असलेल्या मंदिरात ‘जयवर्मा द्वितीय’ याचे मंदिर दिसते. याने स्थापन केलेले ‘ख्मेर’ साम्राज्य इ.स. १४३१ पर्यंत होते(६२९ वर्ष). पुढील काळात याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणावर झालेला आपल्याला दिसतो. ११व्या शतकात ख्मेर साम्राज्य हे परमोच्च शिखरावर होते.या काळातील ख्मेर साम्राज्याचा केंद्रबिंदू ‘अंकोर’ हे जयवर्मा द्वितीयच्या हरीहारालायच्या जवळच राहिला असे दिसते. जयवर्मा द्वितीय या राजामुळे हिंदु धर्म हा भारताबाहेरही तेव्हा राहिला, वाढला असे नक्कीच म्हणता येईल.
यानंतर जावा कडून कंभूज देशावर जी आक्रमणे होत होती ती पण कमी झालेली होती. जयवर्मा द्वितीय याने मोठ्या प्रमाणावर भूभाग ताब्यात घेतलेला दिसतो, राज्य कसे वाढवावे, त्याचे रक्षण कसे करावे याचा एक विशिष्ठ विचार पण त्याच्या मनात होता हे दिसून येते. ज्यास आजच्या काळात आपण ‘blue print’ म्हणतो ती त्याच्या डोक्यात नक्की पक्की असावी आणि त्याप्रमाणे त्याने राज्य वाढवलेले दिसते. हे सर्व करत असताना त्यास आवश्यक म्हणजे ‘ख्मेर’ ही पण राजाश्रयाने त्याने वाढवलेली दिसते. ‘ख्मेर’ लिपीचा पण वापर मोठ्या प्रमाणावर सुरु केलेला दिसतो. यातूनच अ-क्षर अशा गोष्टींना दिलेले महत्व दिसून येते, काहीतरी आपल्या नंतर राहावे हा विचार दिसून येतो. यामुळेच कि काय पण पुढे त्याने ‘देवराज’ पंथाची स्थापना केलेली दिसते. देवराज या शब्दाचे दोन अर्थ दिसून येतात ते म्हणजे राजा हाच देवाचा अंश म्हणजे देव किंवा देवांचा राजा म्हणजे इंद्र (असेही काही पाश्चिमात्य संशोधकांचे मत आहे). यात राजा हाच देव हा अर्थ जास्त सयुक्तीक वाटतो. राजा हा सर्व जनतेचा सांभाळ करणारा, त्यांचे रक्षण करणारा त्यामुळे सुद्धा त्यास देवाचा अवतार मानले गेले आहे आणि मृत्युनंतर तो देवरूप होतो म्हणजे देवच होतो असा भाव आहे.
राजा गादीवर आल्यावर त्याच्या नावाने एक राष्ट्रीय देवालय (मंदिर) बांधले जात असे आणि राजाच्या मृत्यूनंतर त्या राजास एक बिरूद दिले जाई व त्या नावाने पूजा केली जात असे. हे मंदिर नेहमीच त्या राजाच्या उपास्य देवतेचे असे (उदा. शिव, विष्णू इ.). जयवर्मा द्वितीय यास ‘परमेश्वर’ या नावाने संबोधले जाई. यातही राजाचे मृत्युनंतरचे नाव हे जिवंत असतानाच्या नावापेक्षा वेगळेच असे.
स्डोक कोक थोम (sdok kok thom) येथील शिलालेखातून याच्या कार्यकालात याच्याकडे ‘हिरण्यदामन’ नावाचा तांत्रिक आला होता व त्याच्याकडून आपल्या सीमा सुरक्षित करून घेण्यासाठी तांत्रिक कार्य करवून घेतले ते करण्यास हिरण्यदामनने त्यास शैव होण्यास सांगितले. त्याने राजपुरोहितास (शिवकैवल्य) त्याच्याकडील विद्यांचे प्रशिक्षण दिले. पुढे या राजाने फर्मान काढले की या देऊळाची पूजा शिवकैवल्याच्या घराण्यात राहावी तशी ती पुढे चालू होती.
जयवर्मा द्वितीयच्या राजकीय काळात त्याचे अर्थकारण हे प्रामुख्याने शेती आणि मासेमारी यावर अवलंबून होते. त्याच्या राजधानीच्या नवीन जागा पाहताना त्याने जास्तीत जास्त शेतीला उपयुक्त जागा पाहिलेल्या दिसतात. जास्तीत जास्त सपाट आणि भरपूर पाणी असणारे प्रदेश आजूबाजूला असतील याची काळजी घेतली. ‘टोनले सॅप’ नावाच्या १२,८७६ चौ.कि.मी. क्षेत्रफळावर पसरलेल्या मोठ्या जलाशयाच्या जवळ त्याने हरीहरालय, अमरेंद्रपुर या राजधान्या वसवल्या.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteनरेंद्र लेख खूप छान झालाय..कंबोडियातील या राजाची माहिती नेमकी दिली आहे व त्याचा तेथील इतिहासावरील प्रभाव वर्णिला आहे. प्रत्येक देशाच्या इतिहासात असे कर्तुत्ववान राजे / नेते असतातच त्यांची माहिती असणं त्या त्या देशाचा इतिहास कळण्यासाठी आवश्यक असते. साहित्य संवादचे ह्या लेखमाले बद्दल आभार.
ReplyDelete